IPL 2022: गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) आयपीएल २०२२च्या अंतिम फेरीत नरेंद्र मोदी स्टेडियमवर मेगा फायनलमध्ये आमनेसामने आले. सुमारे १ लाख ३० हजार लोक बसण्याची क्षमता असलेले हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. बीसीसीआयने या मेगा इव्हेंटचा समारोप सोहळा अहमदाबादमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. एआर रहमान (A. R. Rahman) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) हे दोन सुपरस्टार समारोप सोहळ्याला उपस्थित होते. रणवीर सिंगने काही अप्रतिम डान्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तर एआर रहमान यांनी आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर एआर रहमान यांच्या गाण्याचा एक लाखांहून अधिक लोकांनी आनंद लुटला. ‘वंदे मातरम’ (Vande Mataram )गाण्यावर जमाव डोलत होता. जवळपास एक लाख लोकांनी ‘वंदे मातरम्’ हे गाणे एकत्र गायले जे भारतीय चाहत्यांसाठी भावनिक आणि नेत्रदीपक दृश्य होते. अशा पद्धतीने ‘वंदे मातरम्’ गाण्याची घटना यापूर्वी कधीच घडली नसावी.

Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
Ricky Ponting Argued With Umpire
IPL 2024 : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रिकी पाँटिंगने पंचाशी घातला वाद, काय होतं कारण? जाणून घ्या
Virat Kohli and Rachin Ravindra Video Viral
CSK vs RCB : सामन्यादरम्यान कोहलीने पुन्हा उत्साहात गमावले भान, रचिन बाद झाल्यावर अशी दिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO
anil kumble praise ravichandran ashwin for taking 500 test wickets
आव्हानांचा निडरपणे सामना केल्यानेच अश्विन यशस्वी! भारताचा माजी कर्णधार कुंबळेकडून स्तुती

(हे ही वाचा: Photos: १ लाख १०००० आसनं, ३००० कार, १० हजार बाईक पार्कींग; असं आहे IPL फायनल होणारं नरेंद्र मोदी स्टेडियम)

(हे ही वाचा: IPL 2022: १५ वर्षानंतरही RCB विजयाच्या प्रतिक्षेत; एकट्या कोहलीवर १५० कोटी तर संपूर्ण टीमवर तब्बल ९०० कोटींचा खर्च)

‘असा’ रंगला सामना

गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने राजस्थानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने सर्वात जास्त तीन गडी बाद केले. त्यामध्ये जोस बटलर, संजू सॅमसन आणि शिमरोन हेटमायर या स्फोटक फलंदाजांचा समावेश होता. साई किशोरने दोन तर शामी, यश दयाल आणि राशीद खान यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत आपल्या कर्णधाराला पुरेपुर मदत केली होती. आयपीएलच्या यावर्षीच्या हंगामात गुजरातच्या संघाचा नव्यानेच समावेश करण्यात आला होता. आपल्या पदापर्णाच्या हंगामात विजेतेपद मिळवून गुजरात टायटन्सने सर्वांची ‘वाहवा’ मिळवली आहे.