IPL 2022: गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) आयपीएल २०२२च्या अंतिम फेरीत नरेंद्र मोदी स्टेडियमवर मेगा फायनलमध्ये आमनेसामने आले. सुमारे १ लाख ३० हजार लोक बसण्याची क्षमता असलेले हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. बीसीसीआयने या मेगा इव्हेंटचा समारोप सोहळा अहमदाबादमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. एआर रहमान (A. R. Rahman) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) हे दोन सुपरस्टार समारोप सोहळ्याला उपस्थित होते. रणवीर सिंगने काही अप्रतिम डान्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तर एआर रहमान यांनी आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर एआर रहमान यांच्या गाण्याचा एक लाखांहून अधिक लोकांनी आनंद लुटला. ‘वंदे मातरम’ (Vande Mataram )गाण्यावर जमाव डोलत होता. जवळपास एक लाख लोकांनी ‘वंदे मातरम्’ हे गाणे एकत्र गायले जे भारतीय चाहत्यांसाठी भावनिक आणि नेत्रदीपक दृश्य होते. अशा पद्धतीने ‘वंदे मातरम्’ गाण्याची घटना यापूर्वी कधीच घडली नसावी.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Kane Williamson being run out Video Viral
NZ vs AUS : केन विल्यमसन सहकारी खेळाडूला धडकला, अन् १२ वर्षात पहिल्यांदाच घडलं ‘असं’, VIDEO होतोय व्हायरल
Irfan Pathan raise question on BCCI about Hardik Pandya
Team India : ‘हे सर्वांना लागू होत नसेल, तर…’, इरफान पठाणकडून बीसीसीआयच्या केंद्रीय करारावर प्रश्न उपस्थित
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया

(हे ही वाचा: Photos: १ लाख १०००० आसनं, ३००० कार, १० हजार बाईक पार्कींग; असं आहे IPL फायनल होणारं नरेंद्र मोदी स्टेडियम)

(हे ही वाचा: IPL 2022: १५ वर्षानंतरही RCB विजयाच्या प्रतिक्षेत; एकट्या कोहलीवर १५० कोटी तर संपूर्ण टीमवर तब्बल ९०० कोटींचा खर्च)

‘असा’ रंगला सामना

गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने राजस्थानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने सर्वात जास्त तीन गडी बाद केले. त्यामध्ये जोस बटलर, संजू सॅमसन आणि शिमरोन हेटमायर या स्फोटक फलंदाजांचा समावेश होता. साई किशोरने दोन तर शामी, यश दयाल आणि राशीद खान यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत आपल्या कर्णधाराला पुरेपुर मदत केली होती. आयपीएलच्या यावर्षीच्या हंगामात गुजरातच्या संघाचा नव्यानेच समावेश करण्यात आला होता. आपल्या पदापर्णाच्या हंगामात विजेतेपद मिळवून गुजरात टायटन्सने सर्वांची ‘वाहवा’ मिळवली आहे.