नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेडिटवरील एका वापरकर्त्याने एचआरसोबत झालेल्या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये केवळ ‘इन-हँड’ (हातात मिळणाऱ्या) पगाराबद्दल विचारल्यामुळे उमेदवाराला तात्काळ नाकारण्यात आले.
‘हातात मिळणाऱ्या पगाराबद्दल विचारल्यावर नकार मिळाला’ या शीर्षकासह पोस्ट केलेली ही बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून त्यावर हजारो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नोकरी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने काय लिहिले?
ही पोस्ट @Puchkipie या रेडिट हँडलवरून शेअर करण्यात आली आहे. यात वापरकर्त्याने दावा केला आहे की, त्याने अर्ज केलेल्या पदाच्या पगाराबद्दल स्पष्टीकरण मागितले असता त्याला थेट नकार देण्यात आला. मुलाखतीपूर्वीच पगाराचा मुद्दा उपस्थित केल्याने ही संधी हातची गेली, असे त्याला वाटले.
वापरकर्त्याची पोस्ट:
“नमस्कार सर्वांना, मी Indeed वर अर्ज केलेल्या एका छोट्या कंपनीच्या प्रतिनिधीने मला मेसेज केला होता. पगाराबद्दल स्पष्टीकरण मागणे ही माझी चूक होती का? त्यांनी मला तात्काळ नाकारले. सध्या नोकरीची बाजारपेठ खूपच वाईट स्थितीत आहे. एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी मला मुलाखतीची संधीही न देता नाकारण्यात आले.”
Redditors कडून उमेदवाराला पाठिंबा
कमेंट्समध्ये अनेक लोकांनी उमेदवाराच्या बाजूने मत मांडले. भरती प्रक्रियेत पुढे जाण्यापूर्वी पगाराची स्पष्टता मागणे पूर्णपणे योग्य असल्याचे अनेकांनी सांगितले:
- पहिली कमेंट: “अशा कंपन्यांमध्ये काम न केलेलेच बरे. ही कंपनी तुझ्या योग्यतेची नाही.”
- दुसरी कमेंट: “तुम्ही कोणत्या प्रकारच्या नोकरीच्या शोधात आहात? वर्षाला ₹२ लाख पगार खूपच कमी आहे. यापेक्षा चांगली नोकरी मिळवण्यासाठी मी तुम्हाला नक्की मदत करेन.”
- तिसरी कमेंट: “तुम्ही थोडक्यात वाचलात! पगाराबद्दल विचारल्यावर अशी प्रतिक्रिया देणारी कंपनी म्हणजे ‘रेड फ्लॅग’ (धोक्याची घंटा) आहे.”
- चौथी कमेंट: “तरुणांचे शोषण करताना या कंपन्या किती अहंकार दाखवतात, याचे हे उदाहरण आहे.”
- पाचवी कमेंट: “याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे जा. पगाराचा प्रश्न विचारल्यावर जर कंपनी चिडत असेल, तर त्यांच्यासोबत काम न करणेच हिताचे आहे.”
- सहावी कमेंट: “वार्षिक ₹२ लाखांच्या नोकरीसाठी इतकं नाटकं? नक्कीच ही काम करण्यासाठी वाईट कंपनी आहे.”
टीप: यापूर्वीही एका महिलेने ‘१६४ दिवस नोकरीशिवाय’ या शीर्षकाचा व्हिडिओ शेअर करून आयटी व कॉर्पोरेट क्षेत्रातील मंदीवर भाष्य केले होते.
