Kumbha Mela 2025 Iitian Baba: सध्याच्या आर्थिक युगात एकीकडे लोक चांगली नोकरी मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करताना दिसतात. चांगले शिक्षण घेत आयुष्यात काही तरी मोठं करण्याची मनीषा बाळगतात. पण, दुसरीकडे काही लोक सनातन धर्म स्वीकारत संन्याशाचे जीवन जगणे पसंत करतात. लाखो नोकऱ्या सोडून त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतली आणि आता सनातन धर्माच्या रक्षणासाठी रात्रंदिवस ते व्यस्त असतात.

आम्ही अशा नऊ IITian संन्यासी साधूंविषयी बोलत आहोत, ज्यांनी कौटुंबिक जीवनाचा त्याग करत संन्यासी बनण्याचा निर्णय घेतला. चला तर मग जाणून घेऊ IIT मधून शिक्षण घेतलेल्या नऊ साधूंविषयी, ज्यांची आता सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.

art festival organized by Nukkad Cafe BhagyaShali Bhavishya Shiksha Foundation for slum children in Pune
प्रतिकूल वास्तवात राहूनही ‘त्यां’चे भविष्य ‘त्यां’नी असे बघितले…! झोपडपट्टीतील मुलांसाठी आयोजित कला महोत्सवात कल्पनेच्या भरारीचे अनोखे दर्शन
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharashtra: 784 percent schools in state now have computer facilities, says report
राज्यातील ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक वाचन, गणित विषयात प्रगती, शालेय शिक्षण विभागाचा दावा
Bhoomiputras of Uran an industrial city paying lakhs for their employment
उरणचे भुमिपूत्र बेरोजगार, उद्योग नगरी उरणचे भूमिपुत्रांना हक्काच्या रोजगारासाठी मोजावे लागतात लाखो रुपये
Ananth Nageswaran
अग्रलेख: कसचे काय नि कसचे काय!
ews certificate
ईडब्ल्यूएस विद्यार्थांना राज्याच्या नमुन्यातच प्रमाणपत्र द्यावे लागणार
Arvi , Shivaji Primary School, Padma Chaudhary,
अशीही एक ‘मॅडम’ ! घर समजून शाळेचं रुपडंच बदलले
Government school Number of students who have increased during the Corona period returns to their original positions Mumbai news
सरकारी शाळा पुन्हा ओस; करोनाकाळात वाढलेली पटसंख्या मूळ पदावर

महाकुंभ मेळा २०२५ मध्ये सहभागी झालेले १० आयआयटीयन्स संन्यासी (Kumbha Mela 2025 Iitian Baba)

१) संदीप कुमार भट्ट (स्वामी सुंदर गोपालदास)

आयआयटी दिल्ली सुवर्णपदक विजेते संदीप कुमार भट्ट यांनी वयाच्या २८ व्या वर्षी लाखोंची नोकरी सोडली आणि संन्यासाचा मार्ग निवडला. आता ते स्वामी सुंदर गोपालदास म्हणून आपले आध्यात्मिक जीवन जगत आहेत.

२) अभय सिंग (मसानी गोरख)

आयआयटी मुंबईतून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असलेले अभय सिंग कॅनडामधील लाखोंचा पगार असलेली नोकरी सोडून संन्यासी साधू बनले. ते भगवान शिवाचे उपासक, भक्त आहेत; आता त्यांनी आध्यात्मिक जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे महाकुंभमेळ्यात त्यांचा प्रेरणादायी प्रवास आता लोकांसाठी आकर्षणाचा भाग बनत आहे.

३) अविरल जैन

अविरल जैन हे आयआयटी बीएचयू (IIT BHU) मधून संगणक विज्ञान पदवीधर आहेत, ज्यांनी २०१९ मध्ये वॉलमार्ट (अमेरिका) मधील करोडोचा पगार असलेली नोकरी सोडत आध्यात्मिक मार्ग स्वीकारला. ते जैन ऋषी विशुद्ध सागर जी महाराज यांचे शिष्य आहेत, ते सध्या आत्मज्ञानाच्या शोधात कठोर तप करत आहेत.

४) संकेत पारीख

आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेले संकेत पारीख यांनीदेखील अमेरिकेतील उच्च पगाराच्या नोकरीचा राजीनामा देत संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. धर्मावर श्रद्धा नसतानाही त्यांनी ज्ञानप्राप्तीसाठी जैन साधू होण्याचा निर्णय घेतला. आचार्य युगभूषण सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ते साधना करत आहेत.

५) आचार्य प्रशांत

आयआयटी दिल्ली आणि आयआयएम अहमदाबादचे पदवीधर, आचार्य प्रशांत यांनीही संन्यासी साधू होण्याचा निर्णय घेतला. आचार्य प्रशांत हे पूर्वी एक आयएएस अधिकारीदेखील होते, पण आता ते संन्यासी बनून “अद्वैत जीवन शिक्षण”द्वारे समाजाला प्रेरणा देण्याचे काम करत आहेत. ते आपल्या प्रवचनातून आणि आध्यात्मिक ग्रंथांद्वारे लाखो लोकांचे जीवन जागृत करत आहेत.

६) महान एमजे (स्वामी विद्यानाथ नंदा)

आयआयटी कानपूर आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या महान एमजे यांनी २००८ मध्ये रामकृष्ण मठाचा भाग बनून संन्यासाचा मार्ग निवडला. ते गणिताचे प्राध्यापकही आहेत आणि आता आध्यात्मिक ज्ञानाद्वारे लोकांना जीवनाचा सखोल अर्थ समजावून सांगत आहेत.

७) गौरांग दास

गौरांग दास हे आयआयटी बॉम्बेचे केमिकल इंजिनिअरिंग पदवीधर, इस्कॉनशी संबंधित प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर आहेत. ते अध्यात्म आणि वैज्ञानिक विचार यांची सांगड घालून जीवनातील समस्यांवरचे उपाय सांगतात.

८) स्वामी मुकुंदानंद

आयआयटी मद्रास आणि आयआयएम कोलकातामधील पदवीधर स्वामी मुकुंदानंद यांनी योग आणि ध्यानाचा प्रचार करण्यासाठी “जगद्गुरु कृपालुजी योग”ची स्थापना केली. त्यांनी आपले कॉर्पोरेट करिअर सोडून आपल्या आत्म्याचे ऐकण्याचे ठरवले आणि आता ते लोकांना संतुलित जीवन जगण्यासाठी प्रेरित करतात.

९) रसनाथ दास

आयआयटी दिल्ली आणि कॉर्नेल विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या रसनाथ दास यांनी इस्कॉनमध्ये सामील होऊन आध्यात्मिक जीवन स्वीकारले. ते “अपबिल्ड” नावाच्या संस्थेद्वारे लोकांमध्ये नेतृत्व आणि आत्म-जागरूकता वाढवण्याचे काम करतात.

१०) राधेश्याम दास

आयआयटी बॉम्बेमधून पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर राधेश्याम दास यांनी १९९७ पासून आध्यात्मिक जागृकता केंद्राचे नेतृत्व करण्यासाठी आपले पुढचे आयुष्य घालवले.

Story img Loader