Bidai Funny Viral Video:  लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा प्रसंग असतो. सोशल मीडियावरही लग्नाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ आश्चर्यचकित करतात; तर काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात. या व्हिडीओंपैकी काही व्हिडीओ हे भावूक करणारे असतात. मग लग्नातला सगळ्यात भावूक करणारा क्षण म्हणजे जेव्हा वधू आई-वडिलांचा निरोप घेते आणि पतीसोबत तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करण्यासाठी निघते तेव्हा. लग्नातला बिदाईचा क्षण हा सगळ्यात अवघड. मुलीचे लग्न आणि लग्नानंतर तिचा हा निरोपाचा क्षण खूप भावनिक असतो. या क्षणी, विशेषतः मुलगी व तिची आई खूप भावनिक होतात आणि रडवेल्या होतात. कित्येक जणी अक्षरश: मोठमोठ्याने धाय मोकलून रडतात. मुलींना त्यांच्या आईला सोडून दुसऱ्या घरी जाणे आणि तिथे नव्याने जीवन सुरू करणे खूप कठीण वाटत असते.

सध्या इंटरनेटवर वधूच्या निरोपाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये वधू तिच्या आईला सोडून जाण्याच्या दु:खामुळे मोठ्याने रडताना दिसत आहे. तथापि, ती इतकी रडत आहे की, व्हिडीओ पाहिल्यानंतर, इंटरनेटवरील लोक भावनिक होण्याऐवजी हसलेत. dilerboy_01 नावाच्या वापरकर्त्याने इन्स्टाग्रामवर निरोपाचा व्हिडीओ शेअर केला आहे, जो काही क्षणांतच व्हायरल झालाय. व्हिडीओमध्ये वधूच्या निरोपाचे दृश्य दिसते. ती घराच्या रस्त्याच्या मधोमध वराच्या गाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोळत आणि रडत आहे.

लग्न समारंभ संस्मरणीय बनवण्यासाठी अनेक वधू आणि वर विविध गोष्टी करतात. तर, काही वधू-वर त्यांच्या विचित्र कृतीमुळे व्हायरल होतात. नुकताच लग्नाशी संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात नववधू निरोपाच्या वेळी जोरजोरात रडताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये नातेवाईक तिला त्यांच्या हातात घेऊन जमिनीवरून उचलण्याचा आणि गाडीच्या सीटवर बसविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. पण, ती वारंवार जमिनीवर पडून ‘मम्मी-गे’ (बिहारमध्ये सामान्यतः तसे म्हटले जाते) म्हणत रडत आहे. सासरी जाण्याच्या विचाराने ती लहान मुलांसारखी रडताना दिसत आहे. अखेर नातेवाइकांनी तिला उचलून गाडीत बसवले. वधूच्या रडण्याचा आवाज संपूर्ण परिसरात घुमला. तिची पाठवणी पाहण्यासाठी जवळपास संपूर्ण गाव जमा झाला. नववधूचा हा व्हिडीओ आता वेगाने व्हायरल होत आहे.

येथे पाहा व्हिडीओ

व्हिडीओवर वापरकर्त्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका वापरकर्त्याने लिहिले, “गावाकडे खरंच असं होतं का.”  त्याच वेळी दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “तिला सरकारी नोकरीवाला नाही मिळाला वाटतं.” अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.