सरकारी शाळांची दुरवस्था लक्षात घेता अनेक पालक आपल्या मुलांना खाजगी शाळेत दाखल करतात. पण त्या गरीब कुटुंबांचे काय ज्यांचं हातावर पोट असतं किंवा सरकारी शाळांवर अवलंबून राहून आपल्या मुलांना चांगल्या भविष्यासाठी पाठवतात. या प्रकरणाबाबत ग्रामसभेत शासकीय शाळेच्या मुख्याध्यापकांच्या संयमाचा बांध फुटला. मुख्याध्यापकांनी शाळेची वाईट स्थिती तर सांगितलीच पण ती सुधारण्यास सक्षम अधिकारी गटविकास अधिकारी (बीडीओ) यांचं दुर्लक्ष होत असल्याचं सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर हे संपूर्ण प्रकरण तामिळनाडूच्या कृष्णगिरीच्या माथुरमधील सलामराथुपट्टी या गावातील एका सरकारी शाळेचे आहे, जिथे ग्रामसभेत शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळेच्या दयनीय अवस्थेबाबत प्रश्न विचारले जातात. ओलाईपट्टीच्या सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकांनी यावर उत्तर देताना जे काही सांगितले, ते सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. ते म्हणाले की, ज्या शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव आहे, त्या शाळेत ९५ विद्यार्थी शिकत आहेत, त्यावर मात करण्यासाठी त्यांना अनेक फेऱ्या माराव्या लागत असून त्याचाही उपयोग होत नाही. ६० वर्षे जुनी इमारत मोडकळीस आली असून, एलकेजी ते तिसऱ्या इयत्तेसाठी एकच खोली आहे, तर चौथ्या आणि पाचव्या इयत्तेसाठी एक खोली आहे. सहावी ते आठवीपर्यंतच्या मुलांना शिकवण्यासाठी जागाच नाही, असा दावा त्यांनी केला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamil nadu government school principal breaks down in the gram sabha on school bad condition video viral prp
First published on: 06-10-2022 at 12:48 IST