कोकणात बहुतांश भागात दमदार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. काही ठिकाणी गेल्या २४ तासांत २५० ते ३५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबई परिसरासह रत्नागिरीत जोरदार पावसाची नोंद झाली. असं असतानाच कोकणामधील महाड तालुक्यामधील धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीचं पाणी नदीवरील पुलावरुन जात असतानाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाने बस घेऊन नदी ओलांडल्याचं दिसत आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ महाडमधील रेवतळे येथील आहे. या व्हिडीओमध्ये नदीचे पाणी पुलावरुन वाहत असतानाही चालकाने बस नदीवरील पुलावरुन नेल्याचं दिसत आहे. या चालकाने बसमधील प्रवाशांचा जीव धोक्यात घालून गाडी पूल दिसत नसतानाही नदीवरील पुलावरुन नेल्याने अनेकांनी संताप व्यक्त केलाय. या चालकावर कारवाई करण्याची मागणी होत असली तरी ही एसटी नक्की कुठून कुठे जात होती?, एसटीचा चालक कोण होता?, त्याने असा निर्णय का घेतला यासारखे प्रश्न अजून अनुत्तरितच आहेत.

bullock cart youth death marathi news
सांगली: शर्यतीवेळी बैलगाड्याच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू
dombivli ganesh nagar marathi news, dombivli concrete road broken marathi news
डोंबिवली: पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या गणेशनगर मधील काँक्रीट रस्त्याची तोडफोड, नागरिकांमध्ये तीव्र संताप
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
navi mumbai buses marathi news, navi mumbai bus poor condition marathi news
डिझेल बसगाड्यांची दुरवस्था, एनएमएमटीच्या डिझेलवरील बसगाड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यावर भर

२०१६ साली २ ऑगस्ट रोजी रात्री सावित्री नदीवरील जुना पूल कोसळल्याने दोन एसटी बस नदीच्या पाण्यात पडल्या होत्या. या दुर्घटनेमध्ये २६ जाणांचा मृत्यू झाला होता. असं असतानाही आता महाडमधील हा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्याने एसटी महामंडळाने या चालकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

पावसाचा जोर…

अरबी समुद्रातून सध्या बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीच्या परिसरात आणि त्यालगतच्या भागात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकणात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. काही भागांत संततधार सुरू आहे. मुंबई आणि परिसरातही सोमवारी पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आदी जिल्ह्य़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाऊस होत आहे. रत्नागिरीत सोमवारी दिवसभरात संध्याकाळी पाचपर्यंत १०२ मिलिमीटर पाऊस झाला. या कालावधीत मुंबईत ४७ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वरसह कोल्हापूर, सातारा आदी भागांत पावसाची नोंद झाली. मराठवाडय़ात परभणी आणि विदर्भातील अमरावती, वर्धासह काही ठिकाणी पाऊस झाला.

बंगालच्या उपसागरातून सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा प्रभाव पश्चिम-उत्तर भागातील राज्यांपर्यंत आहे. त्यामुळे २३ दिवसांपासून दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांत थांबलेला मोसमी पावसाचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. या क्षेत्राचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाडय़ात काही भागांत पाऊस होतो आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पुढील चार दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. विदर्भात तुरळक पावसाची शक्यता आहे.

२४ तासांतील पाऊस

कोकण : मुरुड (३५० मि.मी.), दापोली (२३० मि.मी.), कणकवली, म्हसळा, श्रीवर्धन (२१० मि.मी.), वैभववाडी (२०० मि.मी.), म्हापरा, पेडणे (१९० मि.मी.), चिपळूण (११८ मि.मी.), हर्णे (१६० मि.मी.), मालवण (१५० मि.मी.), देवगड, मंडणगाव, राजापूर, देवरुख (१४० मि.मी.).