‘पाकिस्तानी’ असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले. भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवविले. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करून ते यशस्वीरित्या नष्ट करण्यात आले. या ऑपरेशनबद्दल भारत सरकार आणि भारतीय सशस्त्र दलांचे एका पाकिस्तानी व्यक्तीने कौतुक केले आहे. हे अभूतपूर्व आणि आश्चर्यकारक आहे.
पाकिस्तानी व्यक्तीने केले भारताचे कौतुक
अभय नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि स्वतःला ‘पाकिस्तानी नागरिक’ म्हणवणाऱ्या एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने, भारताच्या भूमिकेचे समर्थन केले आणि ‘व्हिक्टिम कार्ड खेळल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, अभय सुरुवातीलाच सांगतो की, “मी पाकिस्तानी आहे आणि मी ते सरळ सांगेन. भारताला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रथम, तुम्ही त्यांच्या लोकांवर हल्ला करता आणि जेव्हा ते प्रतिसाद देतात तेव्हा अचानक सर्वांना शांततेबद्दल, मानवी हक्कांबद्दल आठवते. पण जेव्हा २६ निष्पाप जीव गेले तेव्हा तीच ऊर्जा कुठे होती? आता जेव्हा भारताने प्रत्युत्तर दिले तेव्हा पाकिस्तान अचानक व्हिक्टिम कार्ड खेळत आहे.”
“भारत किंवा पाकिस्तान दोघांनाही युद्ध नको आहे. पण जेव्हा तुम्ही दहशतवादाला खतपाणी घालायला सुरुवात करता, तेव्हा तो तुमच्याकडे परत आल्यावर आश्चर्यचकित होऊ नका. जेव्हा तुमचे लोक मारले जात नाहीत तेव्हा शांतीचा संदेश देणे सोपे असते. आणि शेवटी, हे भारताने हे सर्व कधीच सुरू केले नाही हे विसरू नका. त्यांनी फक्त प्रतिसाद दिला. आणि माझ्या मते, ते युद्धाचे कृत्य नाही. तो फक्त न्याय आहे,” असे ते पुढे म्हणाले.
अभय यांनी व्हिडिओला कॅप्शन दिले आहे: “एक पाकिस्तानी हिंदू म्हणून – हा माझे मत आहे जय हिंद.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात बहावलपूरचा जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाचा तळ यांचा समावेश आहे.
ऑपरेशन सिंदूर
भारतीय सशस्त्र दलांनी ६ मे आणि ७ मे च्या मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की,”ही कारवाई २५ मिनिटे चालली – पहाटे १:०५ ते १:३० पर्यंत.”
कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की,”ऑपरेशन सिंदूर दरम्यान लक्ष्यित नऊ ठिकाणे गुप्तचर माहितीच्या आधारे निवडण्यात आली. त्या म्हणाल्या की, “भारताने दहशतवादाविरुद्ध केलेल्या हल्ल्यात कोणत्याही लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले नाही. विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या की, “नागरी पायाभूत सुविधा आणि नागरिकांना होणारे नुकसान टाळण्यासाठी ही ठिकाणे निवडण्यात आली होती.”
पाकिस्तानने नागरिकांच्या मृत्यूबद्दल प्रसारित केलेल्या चुकीच्या माहितीला उत्तर देताना, कर्नल सोफिया कुरेशी यांनी स्पष्ट केले की, आतापर्यंत, ऑपरेशन सिंदूरनंतर “पाकिस्तानात नागरिकांच्या मृत्यूचे कोणतेही वृत्त नाही”..