Video Shows Reunion Of Two Friends After Seven years : शाळा, कॉलेज, ऑफिस अशा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये नवनवीन लोकांशी ओळख होत असते. त्यानंतर बघता-बघता ही ओळख मैत्रीमध्ये रूपांतरीत होते. त्यानंतर वेगवेगळे करिअरचे मार्ग निवडल्यामुळे किंवा जॉब सोडल्यामुळे आपला अनेकांशी संपर्क तुटतो. त्यामुळे यादरम्यान अनेक वर्षांत आपल्या शाळेतील मित्र-मैत्रिणींचे चेहरे, त्यांचे राहणीमान खूपच बदलून जाते. पण, कधीतरी अचानक याच मित्र-मैत्रिणींना आपण खूप वर्षांनी भेटल्यावर आपला आनंद गगनात मावत नाही. असेच काहीसे दोन मित्रांबरोबर घडले आहे.

व्हायरल व्हिडीओत एका तरुणाला त्याचा जुना मित्र एका रेस्टॉरंटमध्ये दिसला. त्याच्याजवळ जाऊन त्याला घाबरवून, त्याने मस्ती करण्यास सुरुवात केली. “तू भारतीय सैन्यात आहेस का?” असे विचारताच त्याचा मित्र “का” विचारतो. मग त्यानंतर तो तरुण “तुझं नाव काय?” असे पुन्हा विचारतो. हे ऐकताच मित्र थोडा घाबरला आणि “काय झाले”, असे विचारू लागला. “तुला चुकीचं काम करताना पकडण्यात आलं आहे”, असे तरुणाने म्हणताच “मी काय चुकीचं काम केलं”, असे मित्र आश्चर्याने विचारतो. “तू मित्राला फसवलं आहेस”, असे तो तरुण म्हणतो. हे ऐकून “तू इकडून निघून जा”, असे मित्र रागात म्हणतो. तेवढ्यात तरुण मित्राला आपली ओळख पटवून देतो.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, तरुणाने आपली ओळख सांगताच मित्र स्वतःचे हेल्मेट काढतो आणि त्याचा आनंद गगनात मावत नाही. “अरे, कसा आहेस तू?” असे लगेचच त्या तरुणाला विचारतो आणि त्याला मिठी मारतो. एवढेच नाही तर त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात. कारण- हे दोन्ही मित्र जवळपास सात वर्षे एकमेकांना भेटलेले असतात. बऱ्याच दिवसांनी एखादा मित्र पुन्हा भेटणे ही अशी एक भावना आहे, जी शब्दांत मांडणे कठीण आहे. काही जणांची मैत्री वयानुसार कमी होऊ शकते; पण काही नाती काळाच्या ओघातही टिकून राहतात, जे आज या व्हिडीओत पाहायला मिळाले.

व्हिडीओ नक्की बघा…

मुलांच्या मैत्रीची गोष्टच वेगळी असते (Viral Video) :

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @indiawithoutpolitics या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘७ वर्षांनंतर… एक मिठी आणि हजार आठवणी’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. सात वर्षांनी पुन्हा एकत्र भेटलेल्या या दोन मित्रांचा व्हिडीओ पाहून अनेकांचे अश्रू अनावर झाले आणि “मुलांच्या मैत्रीची गोष्टच वेगळी असते”, “जुने मित्र आपल्याला त्या विशिष्ट काळात परत भेटतात जेव्हा आयुष्य खूप वेगळे होते. जणू काही टाइम कॅप्सूल. आणि त्या व्यक्तीला भेटणे, अचानक आपल्याला आधी आपले आयुष्य कसे होते याची आठवण करून देते आणि हे खूप महत्त्वाचे आहे’ ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत..