मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहेत. सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव, तर विराट कोहलीला रन मशिन म्हणून संबोधित केलं जातं. काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मास्टर ब्लास्टर यांच्या निवृत्तीमुळे क्रिकेटच्या एका युगाचा अंत झाला. सचिन तेंडुलकर यांच्या निवृत्तीवेळी विराट कोहली संघातील तरुण खेळाडू होता. सचिन तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत होता. त्यामुळे सचिन तेंडुलकर यांच्या निवृत्तीवेळी विराट कोहली भावूक झाला होता. त्यावेळी घडलेला प्रसंग सचिन आणि विराट कोहलीने एका मुलाखती दरम्यान सांगितला.

विराट कोहलीला त्याच्या दिवंगत वडिलांनी दिलेल्या पवित्र धाग्याची ही कथा होती. टीम इंडियासोबत सचिनच्या शेवटच्या क्षणांमध्ये विराट त्याच्याकडे गेला आणि त्याने नाराज मास्टर ब्लास्टरला धागा सादर केला. मात्र सचिनने हा धागा न घेता विराटला परत केला. सचिन तेंडुलकर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “मी एका कोपऱ्यात एकटाच बसलो होतो, मी खूप भावूक झालो होतो आणि माझ्या डोळ्यात अश्रू होते. त्यावेळी विराट माझ्याकडे आला आणि मला त्याच्या वडिलांनी दिलेला पवित्र धागा दिला. पण मी म्हणालो तो अनमोल आहे, शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासोबत ठेव. असे म्हणत मी धागा परत केला.”

Ipl 2024 chennai super kings face lucknow super giants for second time
IPL2024 : लखनऊसमोर चेन्नईचे आव्हान
sachin tendulkar finance marathi news
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू की कलाकार?
Ruturaj Gaikwad has been fantastic as CSK captain so far says Hussey
IPL 2024 : गावस्कर यांच्यापाठोपाठ आता चेन्नईचे प्रशिक्षक हसीदेखील प्रभावित; ऋतुराज गायकवाड क्रिकेट जाणणारा माणूस
Kwena Mafaka IPL Debut
IPL 2024 : कोण आहे १७ वर्षीय क्वेना माफाका? मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरताच रचला इतिहास

विराट कोहलीनेही मुलाखतीत दुजोरा देत सांगितले होते की, “भारतात आपण अनेकदा आपल्या हातावर पवित्र धागा बांधतो. माझ्या वडिलांनी मला दिला होता. हा धागा माझ्या बॅगेत ठेवत असे. मला वाटले की ही माझ्याकडे असलेली सर्वात खास गोष्ट आहे. पवित्र धागा मला माझ्या वडिलांनी दिला होता. मी सचिन तेंडुलकर यांना सांगितलं एक छोटीशी भेट आहे जी मला तुम्हाला द्यायची आहे. ही भेटवस्तू देऊन आमच्या सर्वांसाठी तुम्ही किती खास आहात, हे सांगायचे आहे.”

IND vs WI : “दात दाखवू नकोस…”, रोहितनं पुन्हा एकदा चहलला केलं ट्रोल; पाहा VIRAL VIDEO

सचिन तेंडुलकर यांनी १५ नोव्हेंबर १९८९ ते १४ नोव्हेंबर २०१३ पर्यंत २४ वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा केली. सचिन तेंडुलकर अजूनही कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. त्यांच्या नावावर ३४ हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा आहेत. ज्यामध्ये एकूण १०० शतके आणि १६४ अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे विराट कोहलीने २००८ मध्ये भारतासाठी वनडे पदार्पण केले आणि २०११ मध्ये त्याला कसोटी कॅप मिळाली. आतापर्यंत त्याच्या नावावर जवळपास २४ हजार आंतरराष्ट्रीय धावांची नोंद झाली आहे. सचिनसोबत जवळपास निम्मे सामने खेळला आहे. विराटच्या नावावर आतापर्यंत ७० शतके आणि ९२ अर्धशतकांचा समावेश आहे. २०१९ पासून विराट कोहलीच्या ७१ व्या शतकाची वाट पाहत आहे.