धूर आणि धुक्यामुळे देशाची राजधानी दिल्ली सध्या ‘प्रदूषणाची राजधानी’ झाली आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून धुरक्यामुळे दिल्लीतली परिस्थिती आणखी वाईट झाली आहे. धुरक्यामुळे समोरच काही दिसेनासं झालं आहे. लोकांचं आयुष्य धोक्यात आलं आहे. शाळा महाविद्यालयात सुटी जाहीर करण्यात आली आहे. अशी चिंताजनक परिस्थिती सध्या दिल्लीत आहे. यावर सोशल मीडियावर चर्चा रंगल्या असताना वीरेंद्र सेहवागनंही या चर्चेत उडी घेतली.

नेहमीप्रमाणे वेगळ्या शैलीत ट्विट करत वीरूने या प्रकरणाकडे तमाम भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधले. ‘दिल्लीमध्ये इतना कोहरा है की….. ‘ असं ट्विट करत लोकांना या चिंताजनक स्थितीवर काय वाटतं, याबद्दल लिहिण्याचं आवाहन त्याने केले. सेहवागच्या या ‘गाळलेल्या जागा भरा’ आवाहनाला सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. त्यावर लोक व्यक्त होताना दिसून येत आहेत.