आपण वर पाहिलेल्या उपघटकांच्या व्यतिरिक्त राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी खालील काही अतिरिक्त घटकांचाही अभ्यास करावा लागतो-

ल्ल पर्यावरण भूगोल- खरेतर पर्यावरण शास्त्र हा स्वतंत्र उपघटक राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आपल्याला अभ्यासावा लागतो. म्हणून येथेच त्याचा सविस्तर अभ्यास केल्यास पूर्वपरीक्षेसाठी त्याचा जास्त फायदा होतो. यात परिस्थितीकी आणि परिसंस्था, पर्यावरण, अवनती आणि संवर्धन, जैवविविधता, जैवविविधतेचा ऱ्हास, पर्यावरणविषयक कायदे, क्योटो प्रोटोकॉल, नागरी घनकचऱ्याचे व्यवस्थापन यातील जैवविविधता, जैवविविधतेचा अभ्यास. क्योरो प्रोटोकॉल या उपघटकांवर जास्त प्रश्न विचारले जातात. पर्यावरणविषयक सर्व कायदे व्यवस्थित अभ्यासावेत.
ल्ल कृषी परिस्थितीकी- या उपघटकात पिकांचे वितरण, त्याचे उत्पादन, पीक वाढीसाठी आवश्यक असणारे हवामानाचे घटक, जलदर्जा, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, कोरडवाहू शेती आणि तिची समस्या, ठिबक सिंचन, तुषार सिंचन या घटकांचा व्यवस्थित अभ्यास करावा.
ल्ल दूरसंवेदन- परीक्षार्थीना सर्वात अवघड वाटणारा हा घटक आहे. यावर दर वर्षी साधारणत: दोन ते पाच प्रश्न विचारले जातात. हा घटक पूर्वपरीक्षा तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही उपयुक्त आहे. यात दूरसंवेदनाची संकल्पना, भारतीय दूरसंवेदन उपग्रह, दूरसंवेदन याचे नसíगक साधनसंपत्तीमध्ये उपयोजन, भौगोलिक माहितीप्रणाली, जागतिक स्थाननिश्चितीप्रणाली यांचा अभ्यास करावा.
महत्त्वाचे प्रश्न :
१) खालील दिलेल्या भारताच्या नकाशात ‘अ’ या चिन्हाने दर्शवलेला विद्युत प्रकल्प खालीलपकी कोणत्या नदीवर आहे व त्याचे नाव काय आहे?
१) कृष्णा नदीवर, कोयना
२) शरावती नदीवर, शरावती
३) तुंगभद्रा नदीवर, तुंगभद्रा
spr01४) कृष्णा नदीवर, नागार्जुन सागर
२) खालील विधानांचा विचार करा.
अ) आसामची सरहद्द भूतान आणि बांगलादेशाशी आहे.
ब) पश्चिम बंगालची सरहद्द भूतान आणि नेपाळशी आहे.
क) मिझोरामची सरहद्द बांगलादेश आणि म्यानमारशी आहे.
वरील कोणती विधाने बरोबर आहेत?
१) अ, ब आणि क २) फक्त अ आणि ब
३) फक्त ब आणि क ४) फक्त अ आणि क
३) भौगोलिक प्रदेशाला खालील सुस्पष्ट गुणवैशिष्टय़े आहेत.
१) उबदार आणि शुष्क हवामान
२) सौम्य आणि ओला हिवाळा
३) सदाहरित ओक वृक्ष
वरील गुणवैशिष्टय़े खालीलपकी कोणत्या प्रदेशाची आहेत?
१) भूमध्य समुद्राभोवतीचा प्रदेश
२) पूर्व चीन
३) मध्य चीन
४) उत्तर अमेरिकेचा अटलांटिक किनारा
४) खालील विधानांचा विचार करा.
अ) भूमिजन्य निक्षेप प्रामुख्याने समुद्रबुड जमीन व खंडान्त उतार या प्रदेशात आढळतात.
इ) समुद्रबुड जमीन व सागरी मदान यांना जोडणारा दुवा म्हणजे खंडान्त उतार होय.
वरीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत.
१) फक्त अ बरोबर २) फक्त इ बरोबर
३) दोन्ही बरोबर ४) दोन्ही
५) खालील शिखरांचा उंचीप्रमाणे उतरता क्रम लावा.
१) अस्तंभा, साल्हेर, त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर
२) साल्हेर, महाबळेश्वर, अस्तंभा, त्र्यंबकेश्वर
३) महाबळेश्वर, अस्तंभा, साल्हेर, त्र्यंबकेश्वर
४) त्र्यंबकेश्वर, साल्हेर, महाबळेश्वर, अस्तंभा