मीरा भाईंदर मधील ८ गाईना लंपी आजाराची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शहरातील इतर सर्व जनावरांना गोठ्यात बंद ठेवण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहे.

भाईंदर पश्चिम येथील केशवसूष्टीमध्ये मोठ्या संख्येने जनावरे पाळण्यात आली आहेत.यातील आठ गाईना लंपी आजाराची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.यापूर्वी या गाईना प्रतिबंधात्मक लंपी लस  देण्यात आली असल्यामुळे आता आजाराचा प्रभाव कमी प्रमाणात दिसून येत आहे. मात्र इतर जनावरांना या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून या गाईना विलगीकरणात  ठेवण्यात आले आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर
municipal administration not in favour of cut water even lowest water storage in mumbai lakes
पाणीकपातीची गरज नाही! महापालिका प्रशासनाची भूमिका

मीरा भाईंदर शहरात २९ तबेले आहेत.यात भटके व खासगी  असे मिळून दीड हजाराहून अधिक जनावरे आहेत.या सर्व जनावरांचे लसीकरण झाले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र शहरात लंपी आजाराचा संसर्ग पसरू नये म्हणून जनावरांना बंद करण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहे.

“मीरा भाईंदर मधील गाईना लंपी आजाराची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे पालिकेकडून इतर जानावरांचे सर्वेक्षण करून उपाययोजना आखण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे.”रवी पवार – उपायुक्त