विरार : करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर  वसई-विरार शहर आणि ग्रामीण भागात कुपोषित बालकांच्या आकडेवारीत घट झाली होती. परंतु पुन्हा शाळा आणि अंगणवाडय़ा बंद झाल्याने बालकांच्या कुपोषणात वाढ झाली आहे. मागील सहा महिन्यांत शहरी आणि ग्रामीण भाग मिळून ९३५ बालके कुपोषित आढळली. यात १०८ बालके अतितीव्र कुपोषित गटात मोडत आहेत. तर ८२७ बालके मध्यम कुपोषित आढळली आहेत. मध्यम कुपोषित बालकांवर तातडीने उपचार केले नाहीत तर ती अतितीव्र वर्गात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर जिल्ह्यातील जव्हार, वाडा, मोखाडा, तलासरीपाठोपाठ आता वसईतही कुपोषणाचा शिरकाव होत आहे. प्रामुख्याने शहरी आणि विकसित भाग असल्याने कुपोषणाची समस्या निर्माण होणे प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. मागील जुलै ते डिसेंबर महिन्यात वसई तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या वाढताना दिसत आहे. यात पोषण आहाराची कमी असल्याने ही संख्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 935 children malnourished in vasai virar zws
First published on: 22-01-2022 at 01:32 IST