वसई : रेल्वे स्थानकातील गुन्हेगारी, सुरक्षा, अपघात, गस्त अशा बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे पोलीस ठाण्यात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र मागील काही वर्षांपासून वसई रेल्वे पोलीस ठाण्याचा भार केवळ ९७ पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे. सात रेल्वे स्थानकांमधील सुरक्षा अबाधित राखण्यात पोलिसांचे हाल होत आहेत. मंजूर पदापैकी अजूनही ६० ते ६५ जागा रिक्त आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई-विरार व मीरा-भाईंदर शहर हे झपाटय़ाने विकसित होत असून या भागातील नागरीकरण वाढले आहे. त्यामुळे रेल्वे लोकलमधून प्रवाशांची संख्या बेसुमार झाली आहे. मीरारोड ते वैतरणा अशी वसई रेल्वे पोलिसांची ३१ किलोमीटरची हद्द आहे. यात सात स्थानकांचा समावेश आहे. त्यांचा सर्व कारभार हा वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चालतो. यातच विरार, वसई, नालासोपारा, भाईंदर, मीरारोड ही अधिकच वर्दळीची ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र सद्य:स्थितीत आहेत त्या मनुष्यबळातच पोलिसांना सर्व कामे पार पाडावी लागत आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 97 employees vasai railway police station burden seven stations sanctioned posts 60 to 65 seats are still vacant ysh
First published on: 09-12-2022 at 00:02 IST