स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवानिमित्त देशभरात हर घर तिरंगा अभियना सुरू आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. घरांवर तिरंगा ध्वज लावला जात आहे. याच पार्श्वभूमीवर वसई ते विरार अशी भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.

वसईतून सकाळी ७.३० वाजता सुरू झालेल्या या पदयात्रेचा समारोप, सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास विरार येथे झाला. शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे या पदयात्रेचे वैशिष्ट्य ठरले.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत

तब्बल ३०० फुटांहून अधिक लांबीचा तिरंगा हे या पदयात्रेचे प्रमुख एक वैशिष्ट्य होते. सर्वसामान्य नागरीक, विद्यार्थी यांनी हा तिरंगा हाताने उचलून धरला होता.

तिरंग्याचे हे छत्र आपल्या डोक्यावर असून, या तिरंग्याच्या छत्राखाली देशातील जनता एकसंध होत, आपल्या या देशाचे नाव संपूर्ण विश्वात आणखी उज्ज्वल व्हावे यासाठी कटीबद्ध आहे, असा संदेश या पदयात्रेच्या निमित्ताने देण्याचा प्रयत्न करण्यात आला.