स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवानिमित्त देशभरात हर घर तिरंगा अभियना सुरू आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. घरांवर तिरंगा ध्वज लावला जात आहे. याच पार्श्वभूमीवर वसई ते विरार अशी भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.

वसईतून सकाळी ७.३० वाजता सुरू झालेल्या या पदयात्रेचा समारोप, सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास विरार येथे झाला. शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे या पदयात्रेचे वैशिष्ट्य ठरले.

Men travel in womens coaches Safety of women passengers of air-conditioned local at risk
मुंबई : महिला डब्यातून पुरुषांचा प्रवास, वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये

तब्बल ३०० फुटांहून अधिक लांबीचा तिरंगा हे या पदयात्रेचे प्रमुख एक वैशिष्ट्य होते. सर्वसामान्य नागरीक, विद्यार्थी यांनी हा तिरंगा हाताने उचलून धरला होता.

तिरंग्याचे हे छत्र आपल्या डोक्यावर असून, या तिरंग्याच्या छत्राखाली देशातील जनता एकसंध होत, आपल्या या देशाचे नाव संपूर्ण विश्वात आणखी उज्ज्वल व्हावे यासाठी कटीबद्ध आहे, असा संदेश या पदयात्रेच्या निमित्ताने देण्याचा प्रयत्न करण्यात आला.