वसई : करोनाकाळात प्रत्यक्ष भेटींवर नियंत्रण आल्याने आयुक्तांना भेटण्यासाठी मीरा-भईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात आता ‘ई-व्हिजिट’ सेवा सुरू झाली आहे. नागरिकांनी एका व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर आपला अर्ज पाठवल्यास थेट आयुक्तांना दूरदृश्य प्रणाली (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) वर थेट भेटता येणार आहे. या सेवेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून त्यांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण होण्यास मदत होणार आहे.

पोलीस आयुक्त सदानंद दाते हे दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेत सर्वसामान्य नागरिकांना भेटत असायचे. मात्र करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी बंद करण्यात आल्या. यामुळे नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ई-व्हिजिट सेवा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना आपल्या तक्रारीचा अर्ज पोलीस आयुक्तालयाच्याcpoffice.mb-vv@mahapolice.gov.in या ईमेलवर किंवा ८५९१३३६६९८ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवायचा. त्यानंतर संबंधित नागरिकांना ई व्हिजिटची वेळ देण्यात येते. यावेळी पोलीस आयुक्त, संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि तक्रारदार एकाच वेळेच दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधतात. यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तात्काळ होत आहे.

mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
Electricity Contract Workers, maharashtra, Promised Age Relaxation, Permanent Jobs, Yet to Be Fulfilled, nagpur, electricity workers, marathi news, devendra fadnavis,
कंत्राटी वीज कामगारांना वयात सवलतीचे आश्वासन ठरले ‘जुमला’ !
Nagpur police
‘मी पोलीस उपायुक्तांना गोळी घालणार…’ ‘त्या’ एका फोनने…
Nagpur police
‘मी पोलीस उपायुक्तांना गोळी घालणार…’ ‘त्या’ एका फोनने…

राज्य शासनाने दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) अधिकाअधिक वापर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने ही सेवा सुरू केली. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे करोनाकाळातील नियमांचे पालनही होते. नागरिकांचा मुख्यालयात येण्याचा वेळ वाचतो आणि त्यांच्या तक्रारींचे निवारणही होते, असे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सांगितले. या ई-व्हिजिट सेवेद्वारे सध्या दररोज ५ ते १० नागरिक संवाद साधत आहेत. भविष्यात देखील सोयीच्या दृष्टिकोनातून या सेवेचा वापर वाढविण्याचा पोलिसांचा विचार आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी नागरिकांच्या सोयीसाठी ई ऑफिसप्रणाली सेवा सुरू केली होती. त्यानुसार नागरिकांनी पाठवलेले किंवा मेल केलेले अर्ज संगणक प्रणालीवर वरिष्ठांकडे तात्काळ पोहोचतात आणि अवघ्या काही मिनिटांत ते कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवले जातात. यामुळे नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जात आहे.