१२९ कोटींच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला केंद्राची मंजुरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई:  शहरातील घनकचरा प्रकल्प राबविण्यासाठी वसई-विरार महापालिकेने तयार केलेल्या १२९ कोटी रुपयांच्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे शहरातील कचऱ्याची  समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. मात्र वसई-विरार शहर महापालिकेचा गोखिवरे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प २०१३ पासून बंद पडला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. हरित लवादाने यासाठी पालिकेला प्रतिदिन दहा लाख रुपये दंडाची आकारणी केली आहे. घनकचरा प्रकल्प राबविण्यासाठी  महापालिकेने १२९.५४ कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला होता. हा अहवाल केंद्राकडे प्रलंबित होता. याबाबत पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप पुरी यांची दिल्लीत भेट घेतली. शहरातील प्रदूषणाची समस्या आणि घनकचरा प्रकल्प राबविण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे गावित यांनी पुरी यांना पटवून दिले. टप्प्याटप्प्याने या प्रकल्पाचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. केंद्रीय मंत्री पुरी यांनी ही या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या घनकचऱ्याच्या सविस्तर प्रकल्प अहवाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: City waste problem solid waste management project ysh
First published on: 19-01-2022 at 01:18 IST