वसई : मीरा भाईंदर वसई विरार शहरातील महिलांवरील विविध अत्याचारांच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. महिलांच्या हत्या, बलात्कार, विनयभंग, लहान मुलींवर लैंगिक अत्याचार तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत २०२१ मध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून महिलांवरील विविध अत्याचारांत वाढ होत आहे. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या संख्येने चिंता वाढवली आहे . २०२० मध्ये महिला अत्याचाराच्या एकूण १ हजार ५४ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यात वाढ होऊन २०२१ मध्ये त्यात ४४९ ने वाढ झाली आहे. २०२१ मध्ये १ हजार ५३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या वर्षांत शहरात १९ महिलांच्या हत्या झाल्या. बलात्कार २९२, अपहरण ५०२, विनयंभग ४१४, कौटुंबिक हिंसाचार २७० आदी प्रमुख गुन्ह्यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहान मुलींवरील अत्याचारातदेखील वाढ झाली आहे. २०२१ मध्ये बाललैंगिक शोषणविरोधी कायद्याअंतर्गत १४८ गुन्हे नोंदविण्यात आले होते. २०२१ मध्ये त्यात वाढ १२४ ने वाढ झाली आहे. २०२१ मघ्ये पोक्सोअंतर्गत २७२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Concerns increasing atrocities against women ysh
First published on: 25-01-2022 at 00:02 IST