बेकायदा रेती उपशाने पर्यटकांचा जीव धोक्यात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरार :  वसईतील सागरी किनारे पर्यटकांसाठी धोकादायक ठरत चालले आहेत. सागरी किनाऱ्यावर होत असलेल्या बेकायदा रेती उपशाने सागरी किनारे धोकादायक होत चालले आहेत. तहसील आणि पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रेतीमाफिया दररोज शेकडो टन बेकायदा रेती उपसा करत आहेत. यामुळे किनारे खचले जाऊन पर्यटकांचा जीव धोक्यात येत आहे. कोणतीही भीती न बाळगता रेतीमाफिया रात्रीच्यावेळी सागरी किनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात रेतीची चोरी करत आहेत. अर्नाळा ते भुईगाव या संपूर्ण किनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर ही चोरी सुरू होत असून पहाटेपर्यंत चालत असते. रात्र असल्याने त्यांना कोणीही अडवत नाही. यामुळे शेकडो टन रेतीची दररोज चोरी केली जात.  या संदर्भात पोलिसांनी माहिती दिली की, स्थानिक नागरिक असल्याने अनेकवेळा कारवाईत अडचणी येतात. तर तहसील विभागाने मात्र कारवाईस गेल्यास कुणी सापडत नसल्याचे सांगितले. पण स्थानिकांच्या मते दररोज हे रेतीमाफिया किनाऱ्यावरील रेती चोरून नेत आहेत.  

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sand mafia beach illegal endangers lives tourists ysh
First published on: 15-01-2022 at 00:40 IST