विरार :  महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे विरार मध्ये एका चिमुकल्या मुलीचा बळी गेला. रस्त्यात साचलेल्या पाण्यामध्ये महावितरणाची वीज वाहक तार तुटून पडली होती. या पाण्यातुन जाताना एका पंधरा वर्षे मुलीला विजेचा धक्का लागला आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

विरार पश्चिमेकडील बोळींजच्या कृष्णा मथुरा नगर येथील एब्रोल सोसायटीत राहणारी १४  वर्षाची तनिष्का लक्ष्मण कांबळे ही मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास शिकवणीला जात होती. रस्त्यात पाणी साचले होते. त्या पाण्यात महावीतरणाची तार तुटून पडली होती. तनिष्काचा पाय या पाण्यात पडताच तिला विजेचा धक्का लागला आणि ती खाली पडली. आजूबाजूच्या लोकांनी तिला पहिले पण पाण्यात वीज प्रवाह असल्याने तिला कुणाला वाचवीता आले नाही. नागरिकांनी महावितरण विभागाला फोन करून तातडीने वीज पुरवठा खंडित करायला सांगून तिला पाण्यातून बाहेर काढले. पण तोवर वेळ निघून गेली होती. तनिष्काचा जागीच मृत्यू झाला होता.

heatwave heat, people of mumbai, summer season, Citizens, vomiting, dizziness, diarrhea
उष्णतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; नागरिक उलटी, चक्कर व अतिसाराने हैराण
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…