विरार : वसई-विरार महापालिकेने ६५ कोटी रुपये खर्चून उभारलेला विरारच्या बोळींज येथील सांडपाणी प्रकल्प अवघ्या ५ वर्षांत बिघाड झाला आहे. प्रकल्पातील सांडपाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांना घाण आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शहरातली सांडपाणी प्रकल्पात नेणाऱ्या मलवाहिन्या चोकअप झाल्यामुळे सांडपाणी या प्रकल्पापर्यंत जात नसल्याचेही उघड झाले आहे.
वसई-विरार महानगरपालिकेचा विरार येथे एकमेव सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) आहे. या प्रकल्पातून दररोज ३० दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. विरार शहरातील गृहसंकुलांमधील सांडपाणी विविध व्यासाच्या भुयारी गटारामार्फत या केंद्रावर पोहचविले जाते.
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sewage plant at bolinj in virar breakdown in just 5 years zws