भाईंदर, वसईतील गुन्ह्यांमधील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ८२ टक्के

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : मीरा-भाईंदर आणि वसई-विरारच्या पोलिसांनी केलेला सखोल तपास आणि न्यायालयात सादर केलेल्या भक्कम पुराव्यांमुळे २०२१ या वर्षांत ८४९ आरोपींना न्यायालयात शिक्षा झाली आहे. आरोपींना शिक्षा होण्याचे हे प्रमाण ८२ टक्के एवढे आहे. २०२१ या वर्षांत न्यायालयात १ हजार ३४१ खटल्यांची सुनावणी झाली, त्यापैकी ८४९ प्रकरणांतील आरोपींना शिक्षा झाली तर १८८ प्रकरणांतील आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटले. मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने न्यायालयात दोषारोपत्र सादर करताना भक्कम पुरावे गोळा करण्यावर भर दिला. तपास करताना कसलेही कच्चे दुवे राहू नयेत यासाठी कसून सर्व प्रकारचे तांत्रिक, न्यायवैद्यक पुरावे गोळा केले आणि न्यायालयात सादर केले. त्याचा सकारात्मक परिणाम २०२१ या वर्षांत दिसून आला. १५ पोलीस ठाण्यांतर्गत  गुन्हे न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. 

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success police investigation crime accused ysh
First published on: 26-01-2022 at 00:30 IST