नारिंगी जेट्टीला जोडणाऱ्या पोहोच रस्त्याला स्थानिकांचा विरोध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई: विरारच्या नारिंगी जेट्टीला जोडण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे पोहोचरस्ता बनविला जाणार असून त्यासाठी सुमारे ३० कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र या रस्त्याचे ८० टक्के काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी या कामाला विरोध केला आहे.  या कामात भ्रष्टाचार होण्याची शक्यता असून या कामाच्या निविदा रद्द कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. विरारमधील नारिंगी बंदरातील जेट्टीला जोडणारा सव्वा तीन किलोमीटर लांबीचा पोहोचरस्ता तयार करण्याच्या कामाच्या सुमारे ३० कोटी रुपयांच्या निविदा महाराष्ट्र सागरी मंडळाने (महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड) काढल्या आहेत. त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tender ready road protest locals ysh
First published on: 20-01-2022 at 00:02 IST