विरार : नालासोपारा येथे वसई विरार महापालिकेच्या परिवनह सेवेला शुक्रावरी दुपारी अचानक आग लागली. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली. अग्नीशमन विभागाने बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता नालासोपारा स्थानकातून वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेची बस (एमएच ४७ ६३२०) ही महामार्गावर जात होती. या बसमध्ये एकूण १५ प्रवासी होती.

बस नालासोपारा पूर्वेच्या धानिवबाग परिसरातून जात असातना अचानक इंजिन मधून ठिणग्या पडू लागल्या. बसचालक शिवम चव्हाण याने प्रसंगावधान दाखवून बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर जायला सांगितले. इतक्यात बसने पेट घेतला. मात्र तो पर्यंत प्रवासी बस मधून उतल्याने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. या आगीत बस पुर्णपणे जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवली आहे. आग नेमकी कशामुळे लागली ते स्षष्ट झालेले नाही. आग आटोक्यात आणली आहे अशी माहिती पालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख दिलीप पालव यांनी दिली.

PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
Maldhok birds
अग्रलेख: पूतनामावशीचे पर्यावरणप्रेम!
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब
mumbai municipal corporation marathi news, model code of conduct marathi news,
आचारसंहिता लागल्यामुळे पालकमंत्र्यांच्या पालिकेतील हस्तक्षेपावरही मर्यादा