वसई: आर्थिक दुर्बल, मागासवर्गीय तसेच दिव्यांग घटकातील बालकांना नामांकित खाजगी शाळांमध्ये आरटीई  अंतर्गत२५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वसईतील १५३ शाळात ३ हजार ६३७ इतक्या जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज दाखल करावे लागणार आहेत.

मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक आणि दुर्बल घटकांतील पालकांच्या पाल्याला खासगी शाळांमधील २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया वसई तालुक्यात  १४  ते २७ जानेवारी या दरम्यान ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

RTE admission application deadline has expired how many applications have been submitted
आरटीई प्रवेश अर्जांची मुदत संपुष्टात… किती अर्ज दाखल?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharashtra: 784 percent schools in state now have computer facilities, says report
राज्यातील ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक वाचन, गणित विषयात प्रगती, शालेय शिक्षण विभागाचा दावा
Arvi , Shivaji Primary School, Padma Chaudhary,
अशीही एक ‘मॅडम’ ! घर समजून शाळेचं रुपडंच बदलले
Government school Number of students who have increased during the Corona period returns to their original positions Mumbai news
सरकारी शाळा पुन्हा ओस; करोनाकाळात वाढलेली पटसंख्या मूळ पदावर
The application deadline for 25 percent reserved seats in private schools under rte has been extended
‘आरटीई’अंतर्गत प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ, आतापर्यंत किती अर्ज दाखल?
kolhapur becomes first district to ensure 100 percent cctv coverage in government schools
कोल्हापुरातील शाळांना ‘सीसीटीव्ही’चे कवच ! राज्यातील पहिला जिल्हा, १९५८ शाळांमध्ये यंत्रणा कार्यान्वित
teaching being hampered due to various committees are being formed
अबब, राज्यातील शाळांत १८ समित्या! शिक्षक मग शिकवितात केव्हा?

हेही वाचा >>>वसई : दहा वर्षांपासून नायगाव खाडी पुलाचे काम अपूर्णच, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कामकाज ठप्प

वसईत ३  हजार ६३७ जागा राखीव आहेतयात वसई विरार मधील १५३ शाळांचा समावेश करण्यात आला आहे.पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज दाखल करावे लागणार आहेत

तसेच मुदत संपल्यावर संचालक राज्यस्तरावर संपूर्ण राज्याची ऑनलाईन लॉटरी काढण्यात येईल व त्यामध्ये निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल. तालुकास्तरावरील पडताळणी समितीमार्फत निवड झालेल्या मुलांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येऊन पात्र उमेदवारांचे प्रवेश अंतिम करण्यात येतील अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. अर्ज भरताना काही अडचणी असल्या शिक्षण विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी माधुरी पाटोळे यांनी केले आहे.

हेही वाचा >>>खरा चोर कोण….? एका विचित्र चोरीचा नाट्यमय तपास

अर्ज भरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन

आरटीईचे अर्ज दाखल करताना अनेकदा कागदपत्रांची कमतरता तर कधी योग्य माहिती भरली जात नसल्याने पालकांचे अर्ज पुढे जात नाहीत. यासाठी आधीच पालकांनी याची पूर्ण माहिती घेऊनच अर्ज भरावा. याशिवाय आधार कार्ड, निवासी दाखला, जात प्रमाणपत्र, उत्त्पन्न दाखला, १० शाळांची निवड यासह अन्य महत्वपूर्ण कागदपत्रे यांची पुर्तता करावी असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. याची माहिती पंचायत समितीच्या संकेतस्थळावर ही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आरटीई अंतर्गत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यात तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. अर्ज भरताना ही विशेष लक्ष द्यावे जेणेकरून पुढे काही अडचणी येणार नाहीत – माधुरी पाटोळे, गटशिक्षणाधिकारी वसई

Story img Loader