भाईंदर : अवकाळी पावसामुळे यंदा उत्तनच्या प्रसिद्ध हापूस आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. या आंब्याचे केवळ २० टक्केच उत्पन्न आले असून, मोठय़ा व्यापाऱ्यांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याने हा आंबा घाऊक बाजारात विकता आलेला नाही, अशी खंत येथील बागायतदारांनी व्यक्त केली आहे. परिणामी, आंबाप्रेमींना या हापूसची चव चाखता आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात अनेक वर्षांपासून बागायतदार आंब्याचे उत्पन्न घेत आहेत. कोकण किनारपट्टीवरील या आंब्याला ‘उत्तनचा राजा’ अशी ओळख आहे. हा आंबा उशिरा म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस येत असल्यामुळे या आंब्याला विशेष मागणी असते. मात्र यंदा साधारण मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे या आंब्याचे अधिक नुकसान झाले आहे. परिणामी, उत्तन परिसरातील बागांमधून केवळ १५ ते २० टक्केच आंब्याचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे या बागायतदारांचा आंब्याच्या पिकासाठी केलेला खर्चही निघालेला नाही. त्यात हा आंबाच उशिरा येत असल्यामुळे शिल्लक राहिलेल्या आंब्याकडे मोठय़ा व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने तो बाजारात दाखल झालेला नाही.

More Stories onवसईVasai
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttan hapus mango production only 20 percent this year due to unseasonal rains zws
First published on: 24-05-2023 at 03:52 IST