वसई: अनेक वर्षे जुन्या झालेल्या इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी पालिकेकडून आढावा घेतला जात आहे. शहरात ५० इमारती या अतिधोकादायक असल्याचे आढळून आले असून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागांत अजूनही अनेक वर्षे जुन्या असलेल्या इमारती आहेत.  त्यात आजही अनेक ठिकाणी नागरिक राहत आहेत.  परंतु जसजशी वर्षे उलटून जात आहेत त्यातील काही इमारती जीर्ण होत असल्याने धोकादायक बनू लागल्या आहेत. काही वेळा अशा धोकादायक असलेल्या इमारती कोसळून दुर्घटना होत असतात. नुकतीच नालासोपारा पूर्वेच्या तुळींज परिसरातील साई निवास या एकमजली चाळीचा भाग कोसळल्याची घटना घडली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पालिकेने शहरात प्रभागनिहाय सर्वेक्षण करून धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai virar municipal corporation issues notice to 50 dangerous building zws
First published on: 25-01-2023 at 15:01 IST