वसई: नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारतींवर गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात धोकादायक इमारती पाडल्या जाणार आहे. कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. कारवाई सुरू होताच नागरिकांचा प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला आहे.

नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथे ३० एकरचा मोठा भूखंड होता. त्यातील काही भूखंड खासगी तर काही भूखंड कचराभूमी आणि सांडपाणी प्रकल्पासाठी आरक्षित होते. २००६ मध्ये ही जमीन माजी नगरसेवक सीताराम गुप्ता व त्यांचे पुतणे अरुण गुप्ता यांनी बळकावली होती. २०१० ते २०१२ या कालावधीत या जमिनीवर बनावट बांधकाम परवानगी (सीसी) आणि भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) बनवून ४१ अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या. त्यात दोन हजारांहून अधिक कुटुंबे रहातात. मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने या इमारती अनधिकृत ठरवून पालिकेला कारवाईचे निर्देश दिले होते. त्याच अनुषंगाने वसई विरार महापालिकेने पहिल्या टप्प्यात सात धोकादायक इमारती पाडण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजल्या पासून या इमारती मधील नागरिकांना बाजूला करून तोडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
new york city charges congestion fee peak-hour traffic
न्यूयॉर्कमध्ये वाहनचालकांना द्यावे लागणार ‘वाहतूक कोंडी शुल्क’! काय आहे ‘कंजेशन प्रायसिंग’? मुंबईतही अमलात येऊ शकते?
pune municipal corporation will take action against banners
पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती
reconstruction of 40 thousand row houses in navi mumbai news in marathi
बैठ्या घरांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा; पार्किंगची अट शिथिल करण्याचा महापालिकेचा निर्णय
Why is the surrender of Naxalite godmother Tarakka important
३४ वर्षांपासून चळवळीत… १७० हून अधिक गुन्हे, चार राज्यांत १ कोटींचे बक्षीस… नक्षलींची ‘गॉडमदर’ तारक्काचे आत्मसमर्पण का महत्त्वाचे?
Police Commissioner issues stern warning to goons Pune news
पोलीस आयुक्तांकडून गुंडांना कडक इशारा; ‘कायदा पाळा, अन्यथा शहर सोडून जा’

हेही वाचा >>> भाईंदर : फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलेचा क्रेनखाली चिरडून मृत्यू

या कारवाईमुळे या इमारती मध्ये राहणारी शेकडो कुटुंब बेघर झाली असून त्यांनी प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. तर काही रहिवाशांना कारवाई सुरू होताच अश्रू अनावर झाले आहेत.

हेही वाचा >>> माहिती अधिकारात माहिती नाकारली, विरारच्या निवृत्त तलाठ्याला २५ हजारांचा दंड

कारवाई परिसराला छावणीचे स्वरूप

४१ इमारती वरील ही कारवाई आतापर्यंतची पालिकेची सर्वात मोठी कारवाई आहे. यात शेकडो कुटुंब बेघर होणार आहेत. या कारवाईचे तीव्र पडसाद आधीपासूनच उमटू लागले आहेत. कारवाई दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, सीआरपीएफ अशी सर्व यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

आचोळे येथील जागा मलनिस्सारण आणि क्षेपण भूमीचे  आरक्षण आहे. त्या ठिकाणी ४१ इमारती अनधिकृत पणे बांधल्या आहेत.राष्ट्रीय हरित लवादाने महापालिके विरोधात तक्रारी न्यायालयात केल्या होत्या. न्यायालयाने याबाबत इमारत पाडण्याचे आदेश दिल्याने आज पासून कारवाई सुरू केली आहे.

:- अनिलकुमार पवार, आयुक्त वसई- विरार महापालिका

Story img Loader