गरजवंताला आवश्यक दान करणे हे सत्कर्म समजले जाते. कदाचित तुम्ही यासाठी सक्षम नसलात तरी तुमच्याकडे एक अशी गोष्ट नक्कीच आहे जी एखाद्यासाठी अनमोल ठरु शकते, ती म्हणजे रक्तदान. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे याची अभिवाचनाद्वारे पुण्यात अभिनव पद्धतीने जनजागृती करण्यात आली. यातून लोकांचे रक्तदानाबाबतचे समज-गैरसमजही दूर करण्यात आले. ‘सुश्री फाउंडेशन’तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.