भारतीय आहारात फार प्राचीन काळापासून गुळाचा वापर केला जातो. लाडू, पुरणपोळी असे विविध गोड पदार्थ हे पूर्वी गुळापासूनच बनवले जायचे. मुख्यतः सणावारांनाच त्यांचा आहारात समावेश असायचा.
प्रवासाने थकलेल्या व्यक्तीला प्रथम गुळाचा खडा हातावर ठेवण्याची प्रथा होती. त्यानंतर पाणी दिलं जायचं. थकलेल्या व्यक्तीला लवकर ऊर्जा मिळावी हा यामागचा उद्देश होता. पूर्वी साखरऐवजी गुळाचाच वापर अधिक होत होता. त्यामुळे कोणत्याही सणावाराच्या दिवशी गुळपोळी, पुरणपोळी असे पदार्थ हमखास व्हायचे. अशाच निराळ्या गुळाबद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत.