प्लास्टिक हे मानवासाठी दिवसेंदिवस आवश्यक असलेला घटक बनत चालले आहे. त्याचसोबत ते निसर्गासाठी तितकेच घातकही बनत चालले आहे. प्लास्टिकमुळे निसर्गाचे कधीही न भरून निघणारे नुकसान होतेय आणि या निसर्गाच्या ऱ्हासाचे परिणाम आपल्याला आज दिसून येत आहेत. मात्र रोजच्या वापरातील प्लास्टिकला एक नवा पर्याय शोधून काढला आहे पुण्यातील कर्वे नगरमध्ये राहणाऱ्या निसर्गप्रेमी मनिष मुळे यांनी. पाहुयात हा नवा पर्याय नेमका काय आहे ते..