असं म्हटलं जातं काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. पण काश्मीर नक्की कोणाच्या मालकीचा या एका प्रश्नामुळे दोन राष्ट्रांमध्ये सतत वाद होताना दिसतात आणि याचाच परिणाम काश्मिरमधील जनतेवर होतोय. दहशतवादी कारवाया, पोलिसांची सतत छापेमारी यामुळे येथील नागरिकांचं विस्कळीत झालेलं जनजीवन ‘हमिनस्तू’ या एकांकिकेमधून उत्तमरित्या मांडण्यात आला आहे.