करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे पालकांना कधी नव्हे एवढा काळ घरामध्ये मुलांबरोबर मिळत आहे. अनिश्चितता, चिंता, काळजी, घालमेल, एकाकीपणा, कंटाळा अशा विविध प्रकारच्या भावनांना सामोरे जात मुलांचे व कुटुंबाचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे महत्त्वाचे आहे. मुलांना भावनिक साक्षर करण्यासाठी करोनाकाळ महत्त्वाचा आहे, याकडे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप केळकर लक्ष वेधलं आहे. ‘लोकसत्ता मधली सुट्टी’ उपक्रमात ‘करोना काळातील पालकत्व’ या विषयावर डॉ. केळकर यांनी मार्गदर्शन केले.