‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास’ आज उत्साहात प्रारंभ झाला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अमरेंद्र धनेश्वर यांनी प्रसिद्ध बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांची मुलाखत घेतली. यावेळी पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवादनाशी निगडीत आठवणींना उजाळा दिला. तसेच, महोत्सवात सहभागी झाल्याबद्दल अतिशय आनंद होत असल्याचेही सांगितले.विशेष म्हणजे मुलाखीतीवेळी बासरी वाजवल्याचे किती फायदे असतात हे सांगतांना, त्यांनी राजकीय नेत्यांचे कानही टोचले.
बासरीवादनाशी निगडीत आठवणींना दिला उजाळा