आपण आजवर बाह्य जगात मोठ्या प्रमाणात Engineering केलंय आणित्यामुळे आजजगात आपल्याकडे खूप सोयी आणि सुविधा आल्यायेत . कुठल्याही पिढीनं विचारसुद्धा केला नसेल इतका आराम आणि सोयी आपल्याला मिळाल्यायेत. हे सगळं असूनही,या ग्रहावरची सर्वात आरामात असेलेली पिढी असूनही, आपण सर्वात शांत-समाधानी पिढी आहोत असं म्हणू शकत नाही, ह्या ग्रहावरची सर्वात आनंदी आणि प्रेमळ पिढी आहोत असं नक्कीच म्हणू शकत नाही. अनेक प्रकारांनी, ही पिढी सर्वांत त्रस्त पिढी बनतीये,सर्वांत तक्रारखोर पिढी बनती आहे; कारण आपण बाहेरची काळजी घेतोय,पण आपल्या आंतरीकतेसाठी काहीच केलं नाहीये? बाहेरच्या जगाचं Engineering केलंय, पण आपण स्वतःला हवं तसं Engineer करू शकलोय का ? तर आपली संपूर्ण यंत्रणा, हे शरीर, हे मन,आपल्या आतली Chemistry, हवी तशी Engineer करण्याचा एक मार्ग आहे.