‘अकिरा’मध्ये राजस्थानमधून मुंबईत आलेल्या मुलीची कथा सांगण्यात आली आहे. ‘अकिरा’ जोधपूरवरून मुंबईला शिकायला येते आणि अचानक कॉलेजमधील एका आत्महत्या प्रकरणात तिला गोवण्याचे प्रयत्न होतो. पण अकिरा भ्रष्ट व्यवस्था आणि भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध उभी राहते. यावर हा सिनेमा आहे. सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेला ‘अकिरा’, नावाजलेले दिग्दर्शक एआर मुर्गुदास यांनी दिग्दर्शित केला आहे.