‘जॉली एलएलबी २’ अक्षय कुमार असूनही चित्रपटात कुठेही कथेपेक्षा तो प्रभावी ठरत नाही. कथेची गरज म्हणूनच अक्षय कुमार येतो आणि त्याचा युक्तिवाद अभिनयाद्वारे मांडून जातो. त्यामुळे चित्रपट संपल्यावर अक्षय कुमारऐवजी ‘जॉली एलएलबी २’च आपल्या लक्षात राहतो. याचं सर्वस्वी श्रेय ‘जॉली एलएलबी २’चे दिग्दर्शक सुभाष कपूर यांनाच जातं.