राज्यातील सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बडय़ा नेत्यांना अडकवून त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपनं केला. पण आता या प्रकरणात स्वपक्षीय आमदार-खासदार अडकण्याचा धोका लक्षात येताच भाजप सरकारने याबाबत आपल्या भूमिकेत बदल करण्यास सुरुवात केलीये.