भारताच्या ७० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधून केलेल्या भाषणात अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. तब्बल दीड तास चाललेल्या त्यांच्या भाषणाचा मुख्य रोख व्यवस्थेतील पारदर्शकता आणि सुराज्याच्या ध्येयावर राहिला. भारताला प्राप्त झालेल्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करणे ही देशातील १२५ कोटी जनतेची जबाबदारी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच […]