कोहिनूर हिरा भारताची संपत्ती असला तरी तो ब्रिटनकडून परत मिळवता येणार नाही, अशा शब्दांत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टापुढे हतबलता व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांमुळे भारताचे हात बांधले गेले आहेत. त्यामुळे ब्रिटनमधून कोहिनूर परत आणण्यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नसल्याचे सरकारने म्हटले आहे.