सुरक्षेत उणीव राहिल्यामुळे उरी हल्ल्याला सामोरे जावे लागले, या केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या काही दिवसांपूर्वीच्या विधानाचे पडसाद शनिवारी उमटले. संरक्षण मंत्रालयलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उरी दहशतवादी हल्ल्याचा तपास पूर्ण होईपर्यंत उरी कॅम्पच्या ब्रिगेड कमांडरची बदली करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रायलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उरी दहशतवादी हल्ल्याचा तपास पूर्ण होईपर्यंत उरी कॅम्पचे ब्रिगेड कमांडर के. सोमाशंकर बदली करण्यात आली आहे. दरम्यान, उरी कॅम्पच्या नव्या ब्रिगेड कमांडरपदी एस. पी. अहलावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.