आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीमध्ये बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. काँग्रेसने वेळेत निर्णय न घेतल्यास आम्ही २२७ जागा स्वबळावर लढवण्यास सक्षम आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितले.