न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला ठराविक अंतराने धक्के बसल्यावर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने डाव सावरला. पहिल्या दिवसाअखेरीस भारताने ३ बाद २६७ धावा केल्या. ३ बाद १०० या स्थितीतून कोहली आणि रहाणेने भारताला सुस्थितीत आणले. कोहली १०३ तर रहाणे ७९ धावांवर नाबाद आहेत.