पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे सारे श्रेय हे भारतीय सैन्यालाच जाते. आपण केवळ त्याचा एक भाग होतो. त्याचबरोबर ही कृती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवला, याबद्दल मोदींचे आभार मानले पाहिजेत, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत मांडले.