टाटा सन्सचे अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची गच्छंची केल्याचे अपेक्षित पडसाद मंगळवारी शेअर बाजारात पाहायला मिळाले. आज बाजार उघडल्यानंतर टाटा समुहातील प्रमुख कंपन्यांचे समभाग तीन ते पाच टक्क्यांनी कोसळले. सायरस मिस्त्रींना अध्यक्षपदावरून हटवल्याने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.