नोटबंदीचा निर्णय घेऊन मोदी सरकार सामान्य जनतेच्या खिशातील पैसा काढून घेत आहे. नरेंद्र मोदी हा पैसा उद्योगपतींच्या घशात घालणार आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. त्यांनी बुधवारी भिवंडी न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला.