सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता गुरूवारी सरकारकडून अपवादात्मक परिस्थितीत बँक खात्यातून रक्कम काढण्यावरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार आता नागरिकांना लग्नकार्यासाठी बँक खात्यातून अडीच लाखांची रक्कम काढता येणार आहे. त्यासाठी संबंधित खातेधारकाला बँकेत केवायसी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.