मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणात आठ जणांना दोषमुक्त सोडण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. राज्य सरकारच्या याचिकेच्या आधारे हायकोर्टाने निर्दोष सुटलेल्या आठही जणांना नोटीस बजावली आहे. चार आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश हायकोर्टाने प्रतिवाद्यांना दिले आहेत.